मंगळवार, २७ सप्टेंबर, २०११

|| सर्व मंगल मांगल्ये ||

                   – सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके |


                      शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते.||


शारदीय   नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! दिनांक २८-९-११ रोजी बुधवारी शारदीय नवरात्रीला आरंभ होतो आहे.दरवार्ष्याप्रमाणे सर्व भारतात व भारताबाहेरही ह्या नवरात्रीचा महोत्सव धुमधडाक्यात सुरु होणार आहे . आमचे गावी हे नऊ दिवस म्हणजे फार मोठा सोहळा असतो कारण आमचे गावी आई तुळजा भवानी मातेचे माहेर आहे आणि तुळजापूर हे सासर समजले जाते .पालखीचा फार मोठा मान आमचे गावातील देवीच्या भगत म्हणजेच पुजार्याला मिळतो. प्रत्येक मोठ्या घटनेमागे काही तरी कथा , आख्यायिका असते तशी ती कथा आमचे देवीचे बाबतीत सुद्धा आहे तीच कथा पुढे देत आहे.


मन्त्राणां मात्रुका देवी शब्दानां द्न्यानरुपिणी ।द्न्यानामं चिन्मयातीता शुन्यानां शून्यसाक्षिणी ।यस्या परतरं नस्ति सॆषा दुर्गा प्रकीर्तिता ॥ नमस्कार । जय हरि । बंधु आणि भगिनीनो,     आमचे गांव बु-हाणनगर , ता.’नगर हे गांव एका महत्वाच्या कारणासाठि प्रसिध्द आहे , ते म्हणजे छत्रपति शिवाजी माहाराजांची कुलस्वामिनी आई जगदंबा श्री तुळजा भवानी माता हिचे बु-हाणनगर  हे माहेर आहे तीचि बाल्यावस्था आमचे गांवातील जानकोजी तेली (भगत) हयांचेकडे गेले.  
                    घटना मोठि मह्त्वाची आहे..... जानकोजी तेली (भगत)  यांचेकडे एके दिवसी एक छोटी मुलगी रोगग्रस्त असलेली आली म्हणजे हि त्यांची स्वत:ची मुलगी नव्हती पण ! त्यांनी स्वत:च्या पोट्च्या मुलीपेक्षाहि जास्त प्रेमाने तीचा सांभाळ केला तिचा आजार बरा झाला.दिवसा मागुन दिवस जात होते . काळ कधि कोणासाठि थांबत नाहि. मुलगी अंबिका उपवर झालि. पित्याला काळजी वाटु लागली मुळातच ती सुंदर होति त्यात प्रत्यक्ष आदिशक्तीचा अवतार त्यामूळे तेज ओसंडुन जात होते. बापाला अधिकच चिंता वाटू लागलि . खरे तर असे आहे की बापाला लेकीचे ओझे कधिच वाटत नसते पण ! काळजी मात्र वाटत असते. या न्यायाला धरून जानकोजीला काळजी वाटत होती.  मला या ठीकाणी कण्व मुनिंची, राजा जनकाची आठवण येते , शकुंतला हि कण्व मुनिंची ओरस कन्या नव्हति ती महर्षि विश्वामित्रांची होती. भगवती सीतादेवी हि जनकाला शेतामध्ये प्राप्त झालेली कन्याहोति पण या दोघांचेहि या मानस कन्येवर अतिशय प्रेम होते. त्यांच्या विवाहानंतर त्यांना अश्रू आवरत नव्हते. तीच अवस्था जानकोजीची होती. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे तत्त्कालिन काळ म्हण्जे मोगलाच्या सत्तेचा होता.जगण्यासाठि सुध्दा जिथे कर द्यावा लागत होता तिथे बाकीचा विचारच नाहि.

              अहमदनगरचे मुळ नांव अंबिकानगर होते परंतु अहमदशाहाची राजवट सुरू झालि आणि अंबिकानगर्चे अहमदनगर झाले. आमचे गांवहि त्याच काळात बु-हाण्शाहाच्या अंमलाखालि होते त्याच्या नांवावरुनच बु-हाणनगर हे नांव पडले आहे.आता आमचे गांवाला "एकनाथनगर " म्हणतात कारण आमचे गावचे श्री एकनाथ कर्डिले ह्यांना बांगलादेश- युध्दामध्ये मरणोत्तर "विरचक्र" पुरस्कार मिळाला आहे.  त्यामूळे या गांवाला "एकनाथनगर " सुध्दा म्हणतात.(अ’नगर पासुन हे गांव ५ कि.मि. आहे)

              मुस्लिम शासकांचे जनानखाने असंख्य स्त्रियांनि भरलेले असायचे. भोग , विलास यातच शासक रमलेले असायचे. आम्च्या जानकोजीला त्यामुळे चिंता वाटत होती. मन चिंती ते वॆरि न चिंती म्हणतात त्याप्रमाणे च घडले बु-हाण्शाहाच्या नजरेला हे कन्यारत्न पड्ले आणि त्याने जानकोजीला  हुकुम सोडला की ," तुझि मुलगी माझे जनानखान्यात पाठवून दे अन्यथा माझ्या सॆन्याकरवि मी तिला बळजबरिने घेउन जाईन." जानकोजीने त्याचा हुकूम मानला नाही त्याने ठरविले प्राण गेला तरि चालेल पण मी माझ्या अंबिकेला दुष्टाच्या तावडीत सापडु देणार नाहि . जानकोजीला चिंताक्रांत पाहुन अंबिकेने विचारले ," बाबा तुम्हाला कसली चिंता आहे ते मला कळते आहे. तुम्ही काळजी करु नका  मी सर्वसामान्य मुलगी नाही , मी तर अनादि अनंत कधीहि नष्ट न होणारि आहे. मी आदिशक्ति आहे.परित्राणाय साधुनां विनाशाय दुष्क्रुताम । धर्म संस्थापनाय संभवामि युगे युगे ॥ मी धर्माचे रक्षणासाठि व दुष्टांचा नाश करण्यासाठी आले आहे त्यामूळे तुम्ही चिंता करु नका."
               जानकोजीला भगवतीचे खरे स्वरुप कळले होते त्यामुळे त्याची चिंता कमी झाली खरि पण घटना टळत नाहि. विनाश काले विपरित बुध्दी...या न्यायाने  बु-हानशाहाने सॆन्य पाठवून तीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला , पण झाले उलटेच सॆनिकांच्या हाती अंबिका लागली नाहि ती नागरदेवळे-भिंगार- जामखेड मार्गे तुळजापुरला प्रगट झाली. भक्तगणांनी तिचा जयजयकार केला, स्वागत केले. याच तुळजाभवानी मातेने राजा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराजांना साक्षात्कार देउन अफजलखानाचे पारिपत्य केले होते.
 भगवती अंबिका तर बु-हानशाहाच्या हाती लागली नाहि उलट इकडे भयानक तुफान सुरु झाले मेघगर्जनेसह भयंकर पाउस सुरू झाला आणि मोठा भुकंप झाला त्यात बु-हाणनगर उध्वस्त झाले संपुर्ण नगरी पालथी झाली..हा हा हाकार झाला.त्याची खुण म्हणुन की काय पण आजहि आमचे गांवात उत्खननात जर काहि वस्तु सांपडलि तर ती पालथी सांपडते. 
                   अशा या करुणामय भगवतीचा अंबिका मातेचा नवरात्रिचा मोठा उत्सव  असतो या उत्सवामध्ये आमचे गांवचे व सध्या राहुरी मतदार संघाचेआमदार व माजी राज्यमंत्री श्री शिवाजीराव कर्डिले यांचा फार मोठा सहभाग असतो, त्यांचे कुशल नियोजन असते. 
                     तेव्हा सर्व बंधु - भगीनिना विनंति करतो कि आपण आमचे गांवाला यानिमीत्ताने जरुर या आई जगदंबेचे दर्शन व आमचा पाहुणचार स्विकारावा हि आग्रहाची विनंती करतो 


 **********ता.क. तिस-या माळेला येथे पालखि सोहळा असतो, व यात्रेचा मुख्य दिवस असतो.



                                                                                                        आपला स्नेहाकिंत

                                                                                               अशोकानंद महाराज कर्डिले.


संपर्क:- मो.नं. ९४२२२२०६०३ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा